भारताची जनगणना स्वयंसेवक पुन्हा जेव्हा तुमच्या कडे येतील
तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा
आणि खंर बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.
हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.
तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही
जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा (हा लेख त्यांना सुद्धा पाठवा )
फेसबुक वर
हा उपक्रम ( cause ) सुरु करण्यात आला आहे
ह्या उपक्रमाला सामील व्हा ....आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला संदेश पोचू द्या
http://www.causes.com/causes/ 573958-save-sanskrut-language? m=9e4cc0c7&recruiter_id= 98500103
धन्यवाद !!
सचिन हळदणकर :)
फेसबुक वर
हा उपक्रम ( cause ) सुरु करण्यात आला आहे
ह्या उपक्रमाला सामील व्हा ....आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला संदेश पोचू द्या
http://www.causes.com/causes/
धन्यवाद !!
सचिन हळदणकर :)